Please enable javascript. अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी हिंदुजा ग्रुपला घ्यावं लागणार कर्ज, जाणून घ्या काय आहे प्लान - hinduja group to raise 7300 crore to partly fund anil ambani reliance cap buy | The Economic Times Marathi

अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी हिंदुजा ग्रुपला घ्यावं लागणार कर्ज, जाणून घ्या काय आहे प्लान

| Updated: 21 Jun 2024, 1:00 pm

कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल विकत घेण्यासाठी हिंदुजा समूह जोरदार प्रयत्न करत आहे. बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. समूहाने आता दोन रुपयांच्या बाँड ऑफरद्वारे 7,300 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे

 
hinduja group to raise 7300 crore to partly fund anil ambani reliance cap buy
नवी दिल्ली : कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल विकत घेण्यासाठी हिंदुजा समूह जोरदार प्रयत्न करत आहे. बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. समूहाने आता दोन रुपयांच्या बाँड ऑफरद्वारे 7,300 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. यातून उभारलेल्या पैशांपैकी काही रक्कम रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी वापरली जाईल, असा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. समूहाने ही जबाबदारी Barclays Plc आणि 360 ONE ला दिली आहे. या कंपन्यांनी गेल्या आठवड्यात सिंडिकेशन प्रक्रिया सुरू केली असून महिनाभरात हा करार निश्चित होण्याची अपेक्षा आहे. हिंदुजा ग्रुप, बार्कलेज पीएलसी आणि 360 वन यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, एनसीएलटीने रिलायन्स कॅपिटल आणि हिंदुजा ग्रुप कंपनी IIHL च्या यशस्वी बोलीदाराच्या याचिकेवरील सुनावणी 25 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने अनिल अंबानींच्या वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या कर्ज निराकरणासाठी यशस्वी बोली लावली होती. ही प्रक्रिया 27 मे 2024 पर्यंत पूर्ण करायची होती, परंतु कंपनीने मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. एनसीएलटीने गुरुवारी IIHL च्या याचिकेवर सुनावणी केली आणि 25 जून रोजी प्रकरणाची यादी करण्याचे निर्देश दिले. रिलायन्स कॅपिटलने शेअर बाजाराला याची माहिती दिली. एनसीएलटीनेही 13 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी केली आहे.
40,000 कोटी कर्ज
नोव्हेंबर 2021 मध्ये, रिझर्व्ह बँकेने अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड पेमेंट डिफॉल्ट आणि कामकाजातील अनियमिततेच्या आरोपावरून बरखास्त केले होते. मध्यवर्ती बँकेने नागेश्वर राव वाय यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. रिलायन्स कॅपिटलवर 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे आणि दिवाळखोरी प्रक्रियेच्या सुरुवातीच्या फेरीत त्याला बोली प्राप्त झाली होती. मात्र, बँकांच्या समितीने कमी बोली लावून या सर्व योजना नाकारल्या आणि लिलावाची दुसरी फेरी घेतली. यात आयआयएचएल व्यतिरिक्त टोरेंट इन्व्हेस्टमेंटनेही सहभाग घेतला. IIHL ने 9,661 कोटी रुपयांच्या ऑफरसह रिलायन्स कॅपिटलसाठी बोली देखील जिंकली.